पुणे : जिल्ह्याच्या विविध भागांत आज झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणसाठा वाढला आहे. तसेच नागरिकांचे जीवनमान विस्कळित झाले आहे. जोराच्या वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असलेल्या बांबूचे नुकसान झाले आहे..गुंजवणी धरणात ८८ टक्के साठागुंजवणी धरण (ता. राजगड) परिसरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामध्ये धरण पातळीमध्ये वाढ झाली असून, मंगळवार (ता.१९) धरणात ८८.४८ टक्के साठा पाणीसाठा जमा झाला असल्याची माहिती उपअभियंता नयन गिरमे यांनी दिली.राजगड तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून धरण क्षेत्र व रायगड जिल्ह्याच्या लगत असणाऱ्या घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण अधिक आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या निव्ही, कानंद, घेवंडे, घिसर, अंत्रोली या परिसरामधील ओढ, नाले, दुथडी भरून वाहत आहेत, तर डोंगर माथ्यावरील लहान- मोठ्या धबधब्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी धरणात येत असल्याने पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. राजगडचे तहसीलदार निवास ढाणे यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे..हिरडस मावळात बांबू पिकाचे नुकसानभोर तालुक्यातील पश्चिम डोंगराळ हिरडस मावळात सोमवारी (ता. १८) रात्रीपासूनच जोराच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे जीवनमान विस्कळित झाले आहे. जोराच्या वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असलेल्या बांबू पिकाचे नुकसान झाले आहे. बांबूचे नविन आलेले कोंब जोराच्या वाऱ्यामुळे तुटून पडल्याचे हिर्डोशीचे हरिभाऊ नाईलकर यांनी सांगितले.संततधार पावसामुळे नीरा देवघर धरण मंगळवारी सायंकाळी सात वाजता ९९ टक्के भरले असून, धरणात येणाऱ्या येव्याचे प्रमाण वाढल्याने धरणाच्या सांडव्यातून सुरु असलेल्या पाण्याच्या विसर्गात वाढ करून सायंकाळी सात वाजता १२ हजार ३७५ क्युसेक केला. येव्याचे प्रमाण वाढत असल्याने पुन्हा रात्री आठ वाजता विसर्गात वाढ करून १४ हजार ६७८ क्युसेक केला आहे..टेमघर धरणात १०० टक्के साठापुणे शहरवासियांची सुमारे दोन महिन्यांहून अधिक कालावधीची तहान भागविणाऱ्या लवार्डे (ता. मुळशी) येथील टेमघर धरण मंगळवारी (ता. १९) पूर्ण क्षमतेने भरले. पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, मुठा खोऱ्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेले हे धरण मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शंभर टक्के (३.७१ टीएमसी) भरले. संध्याकाळी सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. गेल्यावर्षी धरण ४ ऑगस्टलाच शंभर टक्के भरले होते..पवना धरणाचे सहाही दरवाजे उघडलेतळेगाव दाभाडे/ पवनानगर, ता. १९ : मावळ तालुक्यात गेल्या तीन दिवसांपा सून सर्वत्र दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पवना धरण शंभर टक्के भरले आहे. जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्याने मंगळवारी (दि. १९) सकाळपासून धरणाचे सहाही दरवाजे उघडण्यात आले. त्यातून आधी पाच हजार ७२० आणि सायंकाळी नऊ हजार ९५० आणि रात्री १५ हजार ७७० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. .धरण परिसरात तसेच पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठा झपाट्याने वाढला. त्यामुळे जलसंपदा विभागाने विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. या पाण्यामुळे पवना नदीच्या पात्रातील पाणीपातळी वाढली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये, तसेच धोकादायक ठिकाणी थांबू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हा विसर्ग पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.