tomato agriculture loss
sakal
नारायणगाव - सोमवारी सायंकाळी चार ते साडेचार दरम्यान गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा फटका तालुक्याच्या पश्चिम बागायती भागातील पंधरा ते वीस गावांना मोठया प्रमाणात बसला आहे. गारपिटीच्या तडाख्यामुळे कांदा, आंबा, गहू, टोमॅटो, द्राक्ष, केळी, फुल शेती या पिकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.