मंचर : सातगाव पठार (ता.आंबेगाव) परिसरात खरीप हंगामात पाच हजार एकरांहून अधिक क्षेत्रावरील बटाटा लागवड खोळंबली आहे. गेल्या महिनाभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. .बटाटा लागवडीसाठी खरेदी केलेले बियाणे घरात किंवा पत्र्याच्या शेडमध्ये सुकवण्यासाठी ठेवले असले तरी त्यातील सुमारे १० ते १२ टक्के बियाणे खराब झाले आहे. लागवडीसाठी पावसाने उघडीप देण्याची गरज असून, ‘पावसा पावसा थांब रे!’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे..भावडी (ता. आंबेगाव) येथील शेतकरी अशोक बाजारे म्हणाले, ‘‘राज्यात गेल्या पन्नास वर्षांपासून सातगाव पठारातील पेठ, पारगाव, कोल्हारवाडी, कुरवंडी, थुगाव, भावडी, कारेगाव तसेच खेड तालुक्यातील वाफगाव, वरुडे, जऊळके या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर बटाट्याची लागवड केली जाते. जूनच्या १५ नंतर लागवड सुरू करून जुलैच्या पहिल्या आठवड्यात ती पूर्ण करण्याची परंपरा आहे. पण यंदा मुसळधार पावसामुळे संपूर्ण वेळापत्रकच कोलमडले आहे.’’.Pune News : वळसे पाटील कुटुंबाच्या सामाजिक वारशाचे मी खंबीर वाहक; प्रदीप वळसे पाटील यांची ग्वाही .पारगावतर्फे खेड येथील शेतकरी भाऊसाहेब सावंत पाटील म्हणाले, ‘‘यावर्षी ५० एकर क्षेत्रावर बटाटा लागवड करण्याचे नियोजन असून, त्यासाठी ३५ टन प्रमाणित बटाटा बियाणे खरेदी केले आहे. मात्र, पावसामुळे काम करता येत नाही. बियाण्याला उष्णता व हवाच मिळत नसल्याने त्याचे नुकसान होऊ लागले आहे.’’.शेतकरी अनेक कंपन्यांसोबत करार पद्धतीने बटाटा लागवड करतात. यंदा प्रती किलो बटाट्याला १९ रुपये २० पैसे दर निश्चित झाला आहे. परंतु पावसामुळे वेळेवर लागवड न झाल्याने शेतात काम करणारे मजूरही मोकळे बसून आहेत. त्यांचा खर्च मात्र आम्हालाच सहन करावा लागत आहे.- राम तोडकर, पेठ, ता. आंबेगाव.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.