पुणे - राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून आता पुन्हा उन्ह पावसासह हलक्या सरींचा खेळ सुरू झाला आहे. रायगड जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून भारतीय हवामानशास्त्र विभागाने यलो अलर्ट दिला आहे..तर पुणे आणि सातारा जिल्ह्यात घाटमाथ्यावर रविवारी (ता. २४) ते मंगळवार (ता. २६) दरम्यान तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून येथे येलो अलर्ट भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.कोकण-गोव्यात पुढील चार ते पाच दिवस बहुतांश ठिकाणी, विदर्भात दोन ते तीन दिवस बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यात पुढील दोन दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे..परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यातही पुढील दोन ते तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये सोमवारी (ता. २५) ते बुधवार (ता. २७) दरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. त्यामुळे या काळात विदर्भात यलो अलर्ट दिला आहे..पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी सोसायट्याचा वारा आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर घाट पुढील चार ते पाच दिवस ‘यलो अलर्ट’ आहे, अशी माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.