Maharashtra Government : राज्यसरकारकडून एफआरपीचा स्वतःचा आदेश रद्द; पूर्वीच्याच पध्दतीने एफआरपी अदा करण्याचा निर्णय

Sugarcane Farmers : केंद्रासरकारच्या ऊस नियंत्रण कायदा-१९६० अन्वये गतहंगामाचा उतारा विचारात घेऊन ऊस तुटल्यानंतर चौदा दिवसात शेतकऱ्याला एकरकमी एफआरपी (रास्त व उचित दर) अदा करणे बंधनकारक होते.
Sugarcane Farmers
Sugarcane FarmersSakal
Updated on

सोमेश्वरनगर : मुंबई उच्च न्यायालयाने उसाच्या एफआरपीचे तुकडे करणारा राज्यसरकारचा आदेश फेटाळून लावला होता. या निकालाची एक महिन्याने दखल घेतली असून सहकार विभागाने '२१ फेब्रुवारी २०२२ चा आदेश रद्द करण्यात येत असल्याचा' नवा शासन निर्णय आज काढला आहे. एफआरपी अदा करताना पूर्वीची पध्दत अनुसरण्यात यावी असेही आदेशात स्पष्ट म्हटले आहे. यामुळे कारखान्यांचा हिशेबाबाबतचा संभ्रम संपला असून एकरकमी एफआरपीची कार्यवाही तातडीने करावी लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com