
पुणे - राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलतीची मुदत ३१ मार्चअखेर संपत असली तरी नागरीकांनी मुद्रांक शुल्क भरले असेल, तर पुढील चार महिन्यांत कधीही दस्त नोंदणी करता येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण दस्त रजिस्टर कार्यालयांमध्ये गर्दी करणे टाळावे, असे आवाहन सह जिल्हा निबंधक अनिल पारखे यांनी केले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
राज्य सरकारने दस्त नोंदणी करताना आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कात सवलत देऊ केली आहे. या सवलतीची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. मुदत संपण्यास काही दिवस राहिल्याने दस्त नोंदणी कार्यालयामध्ये गर्दी होऊ लागली आहे.
शहरात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. त्यामुळे दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. अशा वातावरण गर्दी करणे योग्य राहणार नाही. कायद्यातील तरतुदीनुसार दस्तनोंदणी करण्यापूर्वी मुद्रांक शुल्क भरले असेल, तर त्याची नोंदणी पुढील चार महिन्यांपर्यंत कधीही करता येते.
त्यामुळे नागरीकांनी सवलतीचा फायदा घेता यावा, यासाठी ३१ मार्चपूर्वी मुद्रांक शुल्क भरले तर त्या तारखेनुसार पुढील चार महिन्यांत केव्हाही दस्तनोंदणी करता येणार आहे. तसेच त्यांना सवलतीचा लाभही घेता येणार आहे.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.