शिरूरच्या तहसीलदारांनी उचलले महत्त्वाचे पाऊल 

corona logo
corona logo

टाकळी हाजी (पुणे) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कडकडीत बंद असला, तरी पुणे व मुंबई येथून तरकारी, फळे घेऊन ग्रामीण भागातील गावांमध्ये विक्रेते व्यापाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यांच्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा धोका होऊ शकतो. त्यामुळे अशा विक्रेत्यांना देखील 14 दिवस क्वारटांइन करण्याचा आदेश शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांनी दिला आहे. 

जीवनावश्‍यक वस्तू, भुसार व तरकारी व इतर वाहतूक मुंबई, पुणे व इतर ठिकाणाहून करून व्यापारी किंवा नागरिक पुन्हा गावी परत येतात. त्यांना 14 दिवस क्वारंटाइन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. गावातील आपत्ती व्यवस्थापन समितीने याबाबत दक्षता घेऊन अशा लोकांचा संपर्क न होता त्यांना क्वारंटाइन करावे. गांभीर्याने या गोष्टींचा विचार करून कारवाई करावी, असा आदेश तहसीलदार शेख यांनी दिला आहे. 

शिरूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात पुणे व मुंबई येथून किराणा मालाचा भूसारच्या गाड्या आल्या आहेत. तरकारी, अक्षय तृतीयेला आंब्याची आवक झाली आहे. अशी दुकाने थाटून बसणाऱ्या दुकानदारांवर कारवाई होत नाही. त्यामुळे या परिसरात धोका निर्माण झाला आहे. तत्काळ अशा दुकानदारांना क्वारंटाइन करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com