लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर नदीच्या प्रदूषणात होतीये वाढ

water-pollution
water-pollution

आळंदी - पिंपरी महापालिका हद्दीतून रसायनयुक्त पाणी येत असल्याने आळंदीत (ता. खेड) इंद्रायणी नदीचे पाणी फेसाळले असून त्याची दुर्गंधीही येत आहे. परिसरातील रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

लॉकडाउनच्या काळात गेली तीन महिने पिंपरी महापालिका हद्दीतील कारखाने बंद होते. सांडपाणीही नदीत सोडण्याचे प्रमाण अत्यल्प झाले होते. परिणामी, नदीपात्रातील पाणी निवळले होते. मात्र, आता लॉकडाउन शिथिल केल्याने पुन्हा परिसरातील उद्योगांना चालना मिळाली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चिखली, कुदळवाडी, तळवडे भागातील कारखान्यांच्या रसायनयुक्त पाण्यासह सांडपाणीही नदी पात्रात येत आहे. त्यामुळे इंद्रायणीच्या पाण्याला फेस आला आहे. त्याची दुर्गंधीही सुटल्याने सिद्धबेट आणि इंद्रायणीनगरमधील रहिवाशांना त्रास सहन करावी लागत आहे. आळंदी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यातील पाणीही यामुळे दूषित झाले आहे. 

इंद्रायणी नदीच्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांना प्रदूषित पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रदूषणामुळे परिसरात डासांचा उच्छादही वाढला आहे.
- भागवत आवटे, रहिवासी, आळंदी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com