पुणे - ‘भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. याचाच एक भाग म्हणून पुढील दहा वर्षात अडीच ते तीन लाख कोटी रुपयांचे भुयारी मार्ग प्रकल्पांची उभारणी करण्यात येईल,’ अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.