

Dead fish raise fresh concerns over Indrayani pollution
Sakal
आळंदी : इंद्रायणी नदीतील वाढत्या प्रदूषणामुळे नदीपात्रातील मासे मृत पावले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातून सोडल्या जाणाऱ्या प्रदूषित रसायनयुक्त सांडपाण्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण शून्य झाले आहे. इंद्रायणी नदीचा एक प्रकारे खूनच प्रदूषण करणाऱ्या समाजकंटकांकडून होत आहे. आळंदी परिसरातील भाविक आणि ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तीर्थस्नान करणाऱ्या भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न जटील झाला आहे.
छायाचित्र :
आळंदी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतून आलेल्या प्रदूषित सांडपाण्यामुळे इंद्रायणी नदी पात्र काळवंडले असून ऑक्सिजन अभावी मासे मरू लागले आहेत.
पूर्ण: विलास काटे.