
कोरेगाव भीमा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही 1 जानेवारी शौर्यदिनानिमित्त मोठी गर्दी जमली. राज्यभरातील विविध भागांमधून नागरिकांनी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी हजेरी लावली. सामाजिक न्यायाचा प्रतीक असलेल्या या ठिकाणी अनेक बांधव एकत्र येऊन ऐतिहासिक लढ्याला श्रद्धांजली वाहतात. यंदाच्या कार्यक्रमातही प्रकाश आंबेडकर यांनी विजयस्तंभाला अभिवादन करताना महत्त्वपूर्ण विधाने केली.