बारामती - ‘अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टसारख्या या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांचीही मदत घेतली जाईल. कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शेती करण्यासाठी होणाऱ्या प्रयोगांनाही शासन प्रोत्साहन देईल. कृत्रीम बुद्धिमत्तेचा कृषी क्षेत्रातील वापर वाढण्यासाठी शासन प्रोत्साहन देईल,’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.