पालखी महामार्गाच्या भूसंपादनाला अखेर मुहूर्त लागला

khalad
khalad

खळद (पुणे) : गेले कित्येक वर्ष भूसंपादन प्रक्रियेत अडकलेल्या श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाच्या भूसंपादन कामाला मुहूर्त लागला. भूसंपादन नुकसान भरपाईसाठी पुरंदर तालुक्यातील दौंडज, पिंपरी खुर्द, पिसुर्टी, जेऊर व कोळविहिरे या पाच गावांसाठी 68 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, यातील जवळपास पंधरा कोटी रुपयांचे वाटपही पूर्ण झाले असल्याची माहिती भू-संपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या कामाला सुरुवात झाली असून भूसंपादनाची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी आज पिसुर्टी व जेऊर येथे शेतकऱ्यांच्या समवेत शिबिर झाले. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईबाबत व लागणाऱ्या कागदपत्रांबाबत गाढे आणि इतर अधिकाऱ्यांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी तहसीलदार रूपाली सरनोबत, नायब तहसीलदार नंदकुमार झुंजार, अव्वल कारकून ज्ञानेश्वर गुंजाळ, संदीप लोंढे, मंडल अधिकारी, तलाठी व शेतकरी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यात कोरोनाची साखळी तुटेना
         
यावेळी काही कागदपत्रे जागेवरच जमा करून घेण्यात आली. प्रतिज्ञापत्र करण्यासाठी आणि कागदपत्रांच्या फोटो कॉपी काढण्यासाठी फिरत्या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातूनच जागेवरच सर्व व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. येथे ५७ लाखांच्या प्रकरणामध्ये शेतकऱ्यांमध्ये किरकोळ वाद होता. त्याबाबत समुपदेशन करून तसेच कायदेशीर बाबींची माहिती जमीनधारकांना देऊन तो जागेवरच सोडवला व या प्रकरणात कागदपत्रांची पूर्तता सुद्धा तत्काळ करून घेण्यात आली.

कोरोना संसर्गाच्या काळात चांगली रक्कम हातात पडत असल्यामुळे शेतकरी आनंदी आहेत. त्यांनी शासन व प्रशासन दोघांनाही धन्यवाद दिले असल्याचे गाडे यांनी आवर्जून सांगितले. उद्या दौंडज व पिंपरे खुर्द येथे कॅम्प होणार असून, शेतकऱ्यांनी याकामी सहकार्य करत आवश्यक ते कागदपत्रांची पूर्तता करावी, तसेच सामायिक खातेदाराच्या बाबतीत सर्वांची संमती आवश्यक आहेत. याबाबत आपसात किरकोळ काही वाद असल्यास ते मिटविण्याबाबत सर्वांनी पुढे यावे, खातेदार मृत असल्यास त्याबाबत वर्षांच्या नोंदी पूर्ण करून घ्याव्या, असे आवाहन करण्यात आले आहे. 

शेतकऱ्यांमधील क्षेत्राबाबतचे किरकोळ काही वाद असल्यास ते सोडविणेकामी स्थानिक सरपंच, पोलिस पाटील आदींनी सहकार्य केल्यास नुकसान भरपाईची रक्कम त्वरित सर्वांना वाटप करणे शक्य होईल. हा पहिला टप्पा पूर्ण होताच यापुढील टप्प्यांचीही रक्कम लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येईल, असेही सुनील गाढे यांनी सांगितले.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com