

Strategic Goal: Malaria-Free India by 2030
Sakal
लोणी काळभोर : “हिवतापाविरुद्धच्या सामूहिक लढाईत आणि वर्ष २०३० पर्यंत देशाला संपूर्णपणे हिवतापमुक्त करण्याचे आपले ध्येय साध्य करण्यात केवळ निदान आणि उपचारच नव्हे तर स्वतःची आणि आपल्या परिसरातील स्वच्छता तसेच हिवताप नियंत्रण आणि प्रतिबंध याबाबतची सामाजिक जागरुकता तेवढीच महत्त्वाची आहे” असे प्रतिपादन, वैद्यकीय अधिकारी डॉ. दगडू जाधव यांनी केले.