
पुणे - ‘विद्यार्थी आणि उद्योजकांनी शेतमालाच्या प्रक्रियेचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून द्यावे. शिक्षणाचा उपयोग कृषी क्षेत्रात व्यावसायिक पद्धतीने अधिक चांगल्या प्रकारे कसा करता येईल, याचा विचार करावा,’’ असे आवाहन कृषी क्षेत्रातील व्यावसायिक आणि तज्ज्ञांनी व्यक्त केले.
येथील कृषी महाविद्यालयात कृषी क्रांती मंच आणि सकाळ यिनतर्फे गुरुवारी (ता. ९) शिरनामे सभागृहात ‘ॲग्रो युथ समिट’ आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र बनसोड होते. प्रमुख पाहुणे म्हणून बी. व्ही. जी. ग्रुपचे विजयकुमार चोले, कृषिकिंगचे संस्थापक नीलेश शेजवळ, कृषी व्यावसायिक नीलेश चावांके उपस्थित होते. शेतीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायला शिकले पाहिजे.
भाजीपाला, शेतमालाची व्यवस्थित वाहतूक आणि पुरवठा होत नाही. शेतापासून प्रत्यक्ष घरात येईपर्यंत ४० टक्के शेतमाल नष्ट होतो. त्यामुळे थेट घरापर्यंत शेतमाल पोचविण्यासाठी सक्षम पुरवठा यंत्रणा उभारण्याची संधी नवउद्योजकांना आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. चव्हाण यांनी कृषी क्षेत्रातील बदलाबाबत आणि चोले यांनी कृषी क्षेत्रातील संधी आणि प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन केले. सकाळ यिनचे तेजस गुजराथी आणि चावांके यांनी कृषी व्यावसायिक क्षेत्रातील विविध ॲपची माहिती दिली. सोशल मीडियाचा व्यावसायिकदृष्ट्या सकारात्मक वापर करण्यावरही मार्गदर्शन केले. विद्यार्थी, पदवीधर आणि कृषी दूत उपस्थित होते. सकाळ यिनचे शुभम सपकाळे आणि टीमने कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.