पुणे : शेतजमीन वाटपपत्राच्या दस्तावरील नोंदणीशुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे..महसूल विभागाचे सहसचिव सत्यनारायण बजाज यांनी हा आदेश काढला. शेतजमिनीचे वाटप करताना मोजणी करून वाटपाच्या दस्तास मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क द्यावे लागते. मुद्रांकशुल्काचा दर नाममात्र आहे..मात्र नोंदणी शुल्काच्या बाबतीत सवलत नाही व ते जास्त असल्याने अनेक शेतकरी दस्तांची नोंदणी करीत नाहीत. त्यामुळे भविष्यात वाद झाल्यास शेतकऱ्यांना आणि कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अशा दस्तांना नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय गेल्या महिन्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता..काय फायदे होणार?शेतकऱ्यांना वाटपपत्राची नोंदणी सहजपणे करता येणारशेतजमिनीची वाटणी अधिकृतपणे नोंदवून घेण्यास शेतकरी पुढे येतीलकुटुंबांमध्ये भविष्यात होणारे जमिनीचे वाद कमी होण्यास मदतयातून निर्माण होणाऱ्या दाव्यांची संख्याही कमी होणार.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.