
Maharashtra Growth Rate Comparable to Bihar? A Shocking Statement
Sakal
पुणे : ‘‘काही शहरांचा अपवाद वगळता महाराष्ट्राचा विकासदर बिहारसारख्या राज्याशी तुलना करण्यासारखा आहे. राज्यातील विषमता आणि दारिद्र्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गेल्या काही वर्षांपासून बहुसंख्यवाद फोफावला असून, जातीजातींमधील संघर्ष वाढला आहे. या सर्वांवर केवळ ‘महाराष्ट्र धर्म’ हेच उत्तर आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी केले.