

Maharashtra Government Decision On Land Acquisition To Ensure Fair Compensation Based On Actual Farmer Possession
sakal
पुणे : राज्यातील विविध प्रकल्पांसाठी होणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेदरम्यान सामायिक क्षेत्र आणि एकाच सातबारावर अनेक नावे असलेल्या शेतकऱ्यांमध्ये होणारे कौटुंबिक व कायदेशीर वाद टाळण्यासाठी भूसंपादन करण्यापूर्वी जमिनीचा ‘पोटहिस्सा’ निश्चित केला जाईल आणि त्यानुसार ज्याची जेवढी प्रत्यक्ष वहिवाट आहे, त्याला तेवढाच मोबदला स्वतंत्रपणे दिला जाईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.