

Land Survey In Maharashtra 2024 GPS Based Measurement To Eliminate Repeat Surveys For Property Owners
sakal
पुणे : भूमी अभिलेख विभागाकडे २०२४ नंतर तुम्ही मोजणी अर्ज केला होता. त्या अर्जानुसार तुमच्या जमिनीची मोजणी देखील झाली. मोजणीच्या ‘क’ प्रतीवर अक्षांश आणि रेखांशाची नोंद असेल, तर तुम्हाला पुन्हा आयुष्यात मोजणी करून घेण्याची गरज नाही, अशी माहिती जमाबंदी आयुक्त शैलेश नवाल यांनी दिली. त्यामुळे अक्षांश आणि रेखांशांनुसार मोजणी झाली असेल, तर ती मोजणी कायमस्वरूपी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे वारंवार मोजणी करण्याच्या प्रक्रियेतून तुमची सुटका होणार आहे.