

पुणे : राज्यात पहिल्यांदाच इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभरातील नऊ हजार २९४ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी बुधवारपासून (ता. २१) ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. पहिल्या फेरीतील अंतिम गुणवत्ता यादी तीन जूनला जाहीर होणार आहे. तर या फेरीतील विद्यार्थ्यांना ६ ते १२ जून या कालावधीत प्रवेश घेता येणार आहे.