Farmers Protest : ऊसतोडणी बंद ठेवण्याचा इशारा, दरवाढ, पाचट कपात बंद; त्रिस्तरीय समितीची मागणी

Maharashtra Sugar : ऊसतोडणी मशिन मालकांनी प्रतिटन दर ₹५०० वरून ₹७०० करण्याची, बिलातून पाचट कपात थांबवण्याची आणि त्रिस्तरीय समिती स्थापन करण्याची मागणी केली असून, या मागण्या मान्य न झाल्यास १ नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगाम थांबवण्याचा इशारा दिला आहे.
Maharashtra Sugar Crisis

Maharashtra Sugar Crisis

Sakal

Updated on

पुणे : ऊसतोडणी मशिन मालकांनी प्रतिटन दर ५०० रुपयांवरून वाढवून ७०० रुपये करण्याची मागणी केली आहे. तसेच शासन आदेशानुसार ऊसतोडणी मशिन मालक आणि वाहतूकदारांच्या बिलातून पाचट कपात थांबवावी, तसेच ऊसतोडणी दरासंदर्भात त्रिस्तरीय समिती स्थापन करावी, अशा तीन प्रमुख मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास गाळप हंगाम सुरू होण्याच्या दिवशी म्हणजेच एक नोव्हेंबरपासून राज्यातील मशिन मालक ऊसतोडणीचे काम थांबवतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी मशिन मालक संघटनेने दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com