
-प्रकाश शेलार
खुटबाव : १७ ऑगस्ट १६६६ या ऐतिहासिक दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यावरून सुटकेचा प्रारंभ झाला म्हणून हा दिवस ‘शिवचातुर्य दिन' म्हणून साजरा करण्याच्या भूमिकेत महाराष्ट्र शासन आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केले.आग्रा ( उत्तर प्रदेश) येथे शिवाजी महाराजांच्या सुटकेच्या ३५८ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून गरुड झेप मोहीम संस्थेच्या वतीने आग्रा ते रायगड अशा १३१० किमी पदयात्रा व सायकल रॅली अभियानाचा भव्य प्रारंभ पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर झाला.