
पुणे : जम्मू व काश्मीरमध्ये अडकलेल्या राज्यातील प्रवाशांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम राबविली आहे. त्याअंतर्गत हवाई वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून दोन विमानांची सोय करण्यात आली आहे. गुरुवारी पर्यटकांना घेऊन श्रीनगरहून विशेष विमान मुंबईच्या दिशेने उड्डाण करेल. दुपारी तीन ते पाचच्या दरम्यान दोन्ही विमान मुंबई विमानतळावर दाखल होणार आहेत. यात सुमारे १०० पर्यटक हे पुण्यातील रहिवासी आहेत. दोन्ही विमानांत सुमारे १८३ पर्यटक असतील.