

Consumer Panchayat Welcomes Maharashtra Government’s Compensation Scheme
Sakal
मंचर : “महाराष्ट्र शासनाने रस्त्यांवरील खड्डे, उखडलेले रस्ते किंवा संबंधित विभागाच्या हलगर्जीपणामुळे होणाऱ्या अपघातांमध्ये मृत्यू अथवा गंभीर जखमी झालेल्या नागरिकांना नुकसानभरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी जाहीर केला आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे अखिल भारतीय ग्राहक पंचायत स्वागत करत आहे.” असे ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी सांगितले. मंचर (ता.आंबेगाव) येथे शुक्रवारी (ता.२१) झालेल्या पत्रकार परिषदेत औटी बोलत होते. यावेळी मध्य महाराष्ट्र प्रांत सहकोषाध्यक्ष ज्ञानेश्वर उंडे, जिल्हा सचिव अशोक भोर, जुन्नर तालुका अध्यक्ष जगन्नाथ खोकराळे, आंबेगाव तालुका अध्यक्ष देवीदास काळे व संजय चिंचपुरे उपस्थित होते.