Manchar News : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातग्रस्तांना नुकसानभरपाई; राज्य शासनाच्या निर्णयाचे ग्राहक पंचायतीकडून स्वागत!

Consumer Panchayat : महाराष्ट्र शासनाच्या खड्डेमुक्ती व अपघातभरपाई निर्णयाचे अखिल भारतीय ग्राहक पंचायतने स्वागत केले असून नागरिकांना तातडीने तक्रारी नोंदविण्याचे आवाहन केले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मृत्यू व जखमींसाठी भरपाई निश्चित करणारी समिती स्थापन करण्यात आली आहे.
Consumer Panchayat Welcomes Maharashtra Government’s Compensation Scheme

Consumer Panchayat Welcomes Maharashtra Government’s Compensation Scheme

Sakal

Updated on

मंचर : “महाराष्ट्र शासनाने रस्त्यांवरील खड्डे, उखडलेले रस्ते किंवा संबंधित विभागाच्या हलगर्जीपणामुळे होणाऱ्या अपघातांमध्ये मृत्यू अथवा गंभीर जखमी झालेल्या नागरिकांना नुकसानभरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी जाहीर केला आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे अखिल भारतीय ग्राहक पंचायत स्वागत करत आहे.” असे ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी सांगितले. मंचर (ता.आंबेगाव) येथे शुक्रवारी (ता.२१) झालेल्या पत्रकार परिषदेत औटी बोलत होते. यावेळी मध्य महाराष्ट्र प्रांत सहकोषाध्यक्ष ज्ञानेश्वर उंडे, जिल्हा सचिव अशोक भोर, जुन्नर तालुका अध्यक्ष जगन्नाथ खोकराळे, आंबेगाव तालुका अध्यक्ष देवीदास काळे व संजय चिंचपुरे उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com