

Massive Anti-Encroachment Drive: 400+ Structures Demolished in Garib Nagar
पुणे : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेचा कारभार ठप्प झाला आहे. पुढील काळात पावसाळा, पालखी सोहळा यासाठी महत्त्वाचे निर्णय महापालिकेला घ्यावे लागणार आहेत. पण दीड महिना आचारसंहिता असल्याने कोणताही आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय होऊ शकणार नाही. त्यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे मार्गदर्शन मागितले आहे. नगरसचिव योगिता भोसले यांनी यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविले आहे.