

Drinking Water Crisis: Villages in Catchment Area Face Acute Shortage as Bhima River Dries Up
Sakal
चास: चास-कमान ( ता. खेड ) धरणातून सोडण्यात येत असलेले उन्हाळी आवर्तन सुरूच असून धरणात केवळ २४.४७ टक्के ( १.२० टीएमसी ) पाणीसाठा शिल्लक राहिला असून कालव्याव्दारे सुमारे ५६० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होतो आहे, मागील वर्षी धरणात १५.९४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत तो ९ टक्यांनी अधिक आहे. आवर्तन सुरू असल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे.