राष्ट्रवादी आणि काँग्रेसबद्दल काही बोलायलाच नको : राज ठाकरे

MNS Chief Raj Thackeray speaks about Maharashtra Politics
MNS Chief Raj Thackeray speaks about Maharashtra Politics

पुणे : विधानसभा निवडणूकीनंतर महाराष्ट्रात जे काही घडले, तो म्हणजे मतदारांचा अपमान होता. भाजप व शिवसेनेने महाराष्ट्रातल्या मतदारांशी प्रतारणा केली. या नव्या सत्तासमीकरणांमुळे जनतेत नाराजी आहे, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली.  

विधानसभेच्या निकालात एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे, निवडणूकीपूर्वी ज्यांनी पक्षांतरे केली, त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली. भाजप-शिवसेनेला जनतेने बहुमत दिलं, पण त्यांनी जनतेशी प्रतारणा केली. काँग्रेस, राष्ट्रवादीबद्दल बोलायलाच नको, असा टोलाही राज यांनी यावेळी लगावला. 

शरद पवारांच्या पावसातील सभेपूर्वी कोणीही त्यांच्याबद्दल बोलले नाही. तसेच फडणवीस सत्ता स्थापन करू शकले नाही त्यानंतर त्यांच्याबद्दल कोणीही बोलले नाही, यावरून कळतं की, 'यशाला बाप खूप असताता, पराभवाला सल्लागार खूप असतात.' 

आपला देश म्हणजे काही धर्मशाळा नाही 
पुण्यात मनसे कार्यकर्त्यांचे शिबिर घेतल्यानंतर आज (शनिवार) राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर वक्तव्य केले. नागरिकत्व कायद्यावरून देशभर आगडोंब उसळला असून, हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. केंद्र सरकारने मुळ मुद्द्यांवरून लक्ष हटविण्यासाठी असले कायदे आणले जात आहेत. आपला देश धर्मशाळा नाही, असे राज यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com