

Mumbai-Pune Expressway Traffic jam
sakal
लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ टँकर अपघातात झालेली वायू गळती आणि त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी झालेली दिरंगाई, पर्यायाने झालेली वाहतूक कोंडी यामुळे प्रशासनाच्या अनेक मर्यादा उघड झाल्या आहेत.
महामार्गावर झालेली ३३ तासांची कोंडी ही केवळ एक तांत्रिक अडचण नसून, ती एक गंभीर धोक्याची घंटा मानली जात आहे. गॅस टँकरसारखी स्फोटक वाहने जेव्हा प्रमुख मार्गावर उलटतात, तेव्हा प्रशासन आणि नागरिक या दोघांच्याही आपत्ती व्यवस्थापनाची कसोटी लागते. अशा परिस्थितीत संयम आणि पूर्वतयारीच आपल्याला वाचवू शकते, यासाठी नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे, असे नागरिक सांगत आहेत.