पुणे - स्थानीक स्वराज्य संस्थेतील आरक्षण ५० टक्क्यापेक्षा जास्त देण्यात आल्याने याबाबत न्यायालयात सुनावणी सुरू आहे..न्यायालयीन प्रक्रिया जी काय सुरू आहे, त्याबाबत २८ तारखेला कळलेच. पण ज्या ठिकाणी ५० टक्के पेक्षा अधिक आरक्षण पोहोचले आहे. त्या ठिकाणच्या निवडणुकीसंदर्भात प्रश्नचिन्ह उभे राहू शकतात. मात्र, जेथे ५० टक्केपेक्षा आरक्षण आहे अशा जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका वेळेत पार पडतील, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले..मोहोळ यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे. ३ लाखापेक्षा जास्त दुबार मतदार आहेत. त्यावरून सर्वपक्षीय राजकीय पदाधिकाऱ्यांनी आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत..त्याबाबत विचारले असता मोहोळ म्हणाले, ‘मतदार यादी दुबार मतदार असणे हे चुकीचेच आहे. ज्यांनी याच्या तक्रारी केल्या आहेत त्यांचे स्वागतच केले पाहिजे. पण यावरून राजकारण होता काम नये. मतदार याद्यांमध्ये दुबार नावे असणे, मृतांची नावे न वगळणे,पत्ते चुकीचे असणे यासह अनेक त्रुटी गेल्या अनेक वर्षापासून आहेत. त्यामुळे मतदार यादी पूर्णपणे अद्ययावत होणे आवश्यक आहे..त्यावरून राजकारण करू नये. मतदार यादीवरून वोट चोरी केल्याचा आरोप झाला, पण यावरून ज्यांनी राजकारण केले त्यांचे बिहारच जे झाले ते इकडे पुन्हा होऊ शकते. मतदार याद्या अद्ययावत झाल्या पाहिजेत ही भाजपची भूमिका आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.