Uday Samant
sakal
पुणे - ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, बाल साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन अशी अनेक संमेलने आपण बघतो. पण या वर्षापासून ‘वारकरी साहित्य संमेलन’देखील महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू केले जाईल,’ अशी घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी रविवारी केली, तसेच ‘वारकरी संप्रदायाची परंपरा आबालवृद्ध जपत असल्यामुळे समाजात धर्मांध शक्तींना थारा मिळणार नाही,’ असेही सामंत यांनी म्हटले.