
या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांना शेती निगडीत विविध बाबींकरीता अर्ज करावयाचा आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे.
बारामती : शासनाच्या कृषि विभागाने आता महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरीता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाव्दारे देण्यासाठी अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे.
भाजप आमदाराच्या लग्नाला हजारोंची गर्दी; अन् सर्वसामान्यांना फक्त 50 जणांची मर्यादा
या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांना शेती निगडीत विविध बाबींकरीता अर्ज करावयाचा आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे.
महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वत:च्या मोबाईल, संगणक/लॅपटॉप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्राच्या माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील. "वैयक्तिक लाभार्थी "म्हणून नोंदणी करु इच्छिणा-या सर्व शेतक-यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करुन घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्यांकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करुन त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरित करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करुन प्रमाणित करुन घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो, निवडणुका ताकतीने लढवण्याची तयारी करा : वळसे-पाटील
पोर्टलवरील प्राप्त अर्जाची ऑनलाईन लॉटरी, पूर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. यापूर्वीच अर्जदारांनी माहिती भरली असल्यास पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी बदल करु शकतात. ज्या शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर कृषि विषयक योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल, त्यांनी 31 डिसेंबर 2020 अखेर पर्यंत आपले अर्ज पोर्टलवर भरावेत. या तारखेपर्यंत सर्व प्राप्त अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जातील, अशी माहिती तालुका कृषि अधिकारी बारामती दत्तात्रय पडवळ यांनी केले आहे.
(संपादन : सागर डी. शेलार)