

चाकण, ता. ९ : येथील महात्मा फुले बाजारात रविवारी (ता. १०) कांद्याची सुमारे साडेसहा हजार क्विंटल आवक झाली. मात्र, कांद्याचा बाजारभाव घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदील झाले आहेत. लिंबाच्या बाजारात मात्र आवक कमी तसेच उन्हाळ्यामुळे मागणी वाढल्याने भावात वाढ झाली आहे. त्यास घाऊक बाजारात प्रतिकिलोला २०० ते २५० रुपये मिळाले.
चाकण बाजारात कांद्यास प्रतवारीनुसार प्रतिकिलो सहा ते १३ रुपये भाव मिळाला. कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही. कांद्याची निर्यात आखाती प्रदेशातील युद्धसदृश परिस्थितीमुळे ठप्प आहे. पुढील काळात कांद्याची निर्यात सुरू झाली तर कांद्याचे भाव वाढतील, असे व्यापारी माणिक गोरे, जमीरभाई काझी यांनी सांगितले.
लिंबाला मोठी मागणी
चाकण बाजारात सुमारे पाच टन लिंबाची अहिल्यानगर जिल्ह्यातून आवक होत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे लिंबाची मागणी वाढली आहे. आवक कमी व मागणी जास्त असल्याने लिंबाचे भाव वाढले आहेत. लिंबाचे बाजारभाव २०० ते २५० रुपये प्रतवारीनुसार प्रतिकिलोला मिळत असल्याचे व्यापारी विक्रम शिंदे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.