Shirur Farmers : कांद्याला मातीमोल दर; टाकळी हाजी परिसरातील शेतकरी हतबल!

Onion Market : भाव मिळेल या आशेवर वर्षभर कांदा चाळीत ठेवला, पण आता तो अर्ध्याहून अधिक सडून गेला आहे. तरीदेखील बाजारभाव तोच, हातात गाडी भाडेही येत नाही, ही व्यथा आहे शिरूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची.
Onion Prices Crash in Shirur: Farmers Face Heavy Losses

Onion Prices Crash in Shirur: Farmers Face Heavy Losses

sakal

Updated on

संजय बारहाते

टाकळी हाजी : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी बेट भाग परिसरात कांदा हे प्रमुख नगदी पीक आहे. या पिकातून वर्षभर आर्थिक उलाढाल होत असते. मिळालेल्या उत्पन्नातून कर्ज फेडणे, मुला-बाळांचे शिक्षण, आरोग्य आणि लग्न खर्च भागविण्याचे स्वप्न शेतकरी पाहतात. मात्र सध्या कांद्याला मातीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या सर्व आशा मावळल्या आहेत. केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या धरसोड पणाचा धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यावरील कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे .

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com