

Coordination Key for Palkhi Stay in Pune, Final Decision on April 13
sakal
आळंदी: ‘‘संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा पुण्यात दोन दिवस मुक्काम राहणार आहे. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातील मुक्कामाची जागा बदलली, असे दिशाभूल करणारे वृत्त पूर्णतः चुकीचे आहे. मुक्कामाचे ठिकाण बदलण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. पालखी विठोबा मंदिरात काही गैरसोयी आहेत. त्यामुळे प्रशासन, लोकप्रतिनिधी, दिंडी समाज संघटना यांच्याशी चर्चा करून सर्वांनुमते १३ एप्रिल रोजी अंतिम निर्णय आळंदीत घेतला जाईल,’’ अशी भूमिका संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी (ता.३१) मांडली.