पुणे : पादचारी मार्गावरची गाडी उचला अन्यथा नोंदणी रद्द

नोटीस लावल्यानंतर ७ दिवसात गाडी उचलावी लागणार.
footpath cars
footpath carsSakal

पुणे : रस्त्याच्या कडेला महिनोंमहिने चारचाकी, दुचाकी लावलेल्या असतात. धुळीने माखलेल्या, घाण झालेल्या गाड्यांकडे लक्ष देण्यासाठी त्यांचा मालक तयार नसतो. अशा गाड्यांमुळे महापालिकेला (pune municipal corporation) रस्ते झाडताना, दुरुस्ती करताना अडथळा होत असल्याने आता थेट कारवाई (Action) केली जाणार आहे. नोटीस लावल्यानंतर ७ दिवसात गाडी उचलली तर ठिक नाही तर आरटीओची नोंदणी (RTO Registration) रद्द करू या गाड्या लिलाव करण्यासाठी उचलल्या जाणार आहेत. (Pune Marathi News)

पुणे महापालिकेकडून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी विविध उपाय योजना सुरू आहेत. स्वच्छ भारत अभियानात यंदा देशात पाचवा क्रमांक आलेला आहे. नागरिकांमध्ये जनजागृती झाल्याने घनकचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत आहे. पण आता यामध्ये शहरात पडून असलेल्या गाड्यांचा अडथळा निर्माण होत आहे.शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये चारचाकी गाड्यांसाठी पार्किंग नाही, वस्त्यांमध्ये देखील चारचाकी लावण्यासाठी जागा नसते.

footpath cars
पारंपरिक शेतीकडून आधूनिकतेकडे... 'स्पिरुलिना फार्मिंग'मधून लाखोंचं उत्पन्न; पाहा व्हिडिओ

अनेकांकडे एक पेक्षा जास्त चारचाकी असल्याने या गाड्या घराजवळच रस्‍त्यावर लावल्या जातात. त्यामुळे प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळातही रस्ते कायमस्वरूपी पार्क केलेल्या गाड्यांमुळे व्यापून गेले आहेत. या गाड्या दोन तीन आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा अशा वापरल्या जातात. तर काही गाड्या या वर्षानुवर्षे एकाच जागेवर आहेत.

या चारचाकींमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहेच, पण त्या शिवाय महापालिकेला रस्ते स्वच्छ करता येत नाहीत. या गाड्यांखाली मोठ्याप्रमाणात कचरा साठून राहात आहे. डांबरीकरण करताना या गाड्यांमुळे पूर्ण रस्ते चांगले होऊ शकत नाहीत अशा अनेक अडचणी येत असल्याने शहराचे विद्रूपीकरण होत आहे. त्यामुळे अशा गाड्यांवर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

अशी होणार कारवाई

महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांना रस्ता अडवून ठेवणाऱ्या, स्वच्छतेस कारणीभूत ठरणाऱ्या गाड्या शोधण्याचे आदेश दिले आहेत. या गाड्यांच्या नंबरवरून गाडी मालकाला नोटीस बजावली जाणार असून, सात दिवसात रस्ता, पादचारी मार्ग, पुलाखालील गाडी उचला अन्यथा गाडी जप्त केली करा.

गाडी सोडली तरी १० हजाराचा दंड

सात दिवसात गाडी रस्त्यावरून काढून घेतली नाही महापालिकेकडून गाडी जप्त करून गोडावूनला नेली जाणार आहे. आरटीओची प्रक्रिया पूर्ण होण्याआधी नागरिकांनी संपर्क केल्यास त्यांना १० हजाराचा दंड ठोठावला जाणार आहे. तर जे नागरिक संपर्क साधणार नाहीत अशांच्या गाडीची नोंद रद्द करण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव पाठवून दिला जाणार आहे. नोंदणी रद्द झालेल्या गाड्यांचा लिलाव केला जाणार आहे.

footpath cars
आरक्षण समाजालाच दान करण्याची चळवळ सुरु झाली पाहिजे - डॉ.न.म.जोशी

‘‘रस्ता, पादचारी मार्गावर लावलेल्या गाड्यांमुळे शहर अस्वच्छ होण्यास हातभार लागत आहे, त्यामुळे अशा चारचाकी, दुचाकी जप्त केल्या जाणार आहेत. क्षेत्रीय कार्यालयांना याचे आदेश दिले आहेत. तसेच संपर्क न साधणाऱ्या नागरिकांच्या गाड्यांची आरटीओकडून नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया केली जाईल. ही कारवाई १५ जानेवारीपासून सुरू केली जाईल. त्यापूर्वी वाहनांवर नोटीस लावली जाणार आहे.’’

- माधव जगताप, उपायुक्त, अतिक्रमण विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com