

Heartbreak on the Wari Route: Devotees Die Before Reaching Pandharpur
sakal
वाल्हे/जेजुरी: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या श्रद्धेचा, समतेचा आणि भक्तीचा सोहळा मानली जाते. मात्र, बेलसर टोलनाक्याजवळ घडलेल्या या दुर्घटनेने लाखो वारकऱ्यांच्या मनावर वेदनेचा ठसा उमटविला. विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या तीन भगिनींची वारी अर्ध्यावरच संपली, तर त्यांच्या सहकाऱ्यांनी डोळ्यांसमोर घडलेले हे दृश्य आयुष्यभर विसरता येणार नाही, अशी भावना व्यक्त केली. ‘माउली, पुढच्या वर्षी पुन्हा या’ असे म्हणणारे वारकरी यावेळी मात्र अश्रूंनी निरोप देत होते.