
- प्रसाद कानडे
पुणे - चालकांचे समुपदेशन, संवाद व प्रशिक्षण, याचे फलित म्हणून ‘पीएमपी’ बस अपघाताला ‘ब्रेक’ लागला आहे. अपघातग्रस्तांचे प्रमाणदेखील लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या वर्षात अपघातांचे प्रमाण ११.१७ टक्के होते, एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ मध्ये हे प्रमाण ९.१२ झाले, तर आता हे प्रमाण ४.८ टक्क्यांवर आले आहे. ‘पीएमपी’ प्रशासनाने चालकांना योग्य ‘मार्गावर’ आणल्याने अपघातांचे प्रमाण घटले आहे.