चिंताजनक! 'त्यांनी' पुणे, मुंबईहून आलेल्यांना दिला आश्रय: पुढे घडले असे...

Crime1
Crime1

वालचंदनगर : पुणे व मुंबईहून आलेल्या 11 नागरिकांना आश्रय दिल्याप्रकरणी अंथुर्णे (ता. इंदापूर) येथील चार जणांवर भारतीय साथीचा रोग अधिनियमानूसार गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी सिताराम कोंडीबा शिंदे, बापू विठ्ठल गायकवाड, संजय विठ्ठल जाधव, नारायण बजरंग माने (रा. अंथुर्णे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अंथुर्णे गावामध्ये पुणे व मुंबईहून 11 नागरिक राहण्यासाठी आले आहेत.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

या नागरिकांना या चौंघाना राहण्यासाठी आश्रय दिला आहे. हे 11 जण विलगीकरणाचे नियम न पाळता गावामध्ये मास्क न वापरता बिनधास्तपणे फिरत होते. अंथुर्णेचे ग्रामसेवक दिपक भोसले यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात चौंघाविरूद्ध फिर्याद दिली आहे. तपास पोलिस हवालदार प्रकाश माने करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com