
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, काही ठिकाणी वाहतूक कोंडी मॅन्युअली सोडवणं शक्य नसते. पावसाळा सुरू होत आहे. त्यासाठी ट्राफिक मॅनेजमेंट गरजेचे आहे. गेल्या वर्षी आपण पाऊस येण्याअगोदर तयार नव्हतो असे दिसले होते. गेले वेळी पोलीस नियोजन नव्हते, असं त्यांनी यावेळी सांगितले आहे.