
पुण्यात उत्तम नियोजन
मुंबईसह राज्यातील अनेक मोठ्या शहरांमधून कामगारांचे अक्षरशः लोंढे पायी रस्त्याने, लोहमार्गावरुन जाताना दिसत आहेत. बस, रेल्वे स्थानकात गर्दी होऊन गोंधळ उडत आहे. मात्र पुण्यात असे चित्र नाही, याविषयी डॉ. शिसवे म्हणाले, ""आम्ही दोन महिन्यांपासून कामगारांच्या कुटुंबांची राहण्याची, जेवण्याची व्यवस्था केली. वृद्ध, मुलांचे औषधोपचार केले. त्यामुळे अनेकांनी पायी जाण्याचे टाळले. तसेच गावी जाण्यासाठी बस व्यवस्थाही करून दिली.
४०५ कुटुंबांना आधार ; २५ हजार परप्रांतीयांना पोचविले सुखरुप घरी
पुणे - सहा महिन्यांचे बाळ कडेवर घेऊन निघालेली एक आई, तिच्या बरोबर दमलेल्या अवस्थेतच पाठीवर सॅक, पिशवीसह जड पावलांनी चालणारी पाच-सहा वर्षांची दोन मुले, डोईवर गाठोडी घेतलेल्या दोन मुली आणि संसाराचे पोतभर ओझे डोक्यावर घेतलेला बाप. खराडी येथून पायी बालेवाडीला व तेथून झारखंडला निघाले होते.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
येरवड्याजवळील अंधाऱ्या रस्त्यावरुन पायी जाणाऱ्या या कुटुंबाला पाहून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची गाडी थांबली. कामगार कुटुंब घाबरलेल्या अवस्थेत गाडीकडे पाहू लागले. गाडीतून पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे उतरले. "तुम्ही लेकराबाळांना घेऊन पायी जाऊ नका, जेवण घ्या, आराम करा, आम्ही तुमच्या जाण्याची व्यवस्था करतो'', अशी विनंती केली. या प्रसंगाने गहिवरलेल्या पती-पत्नीनेही त्यांना हात जोडले.
पुणे : शहरातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास होणार? महापालिका मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
या पद्धतीने गावाकडे निघालेल्या ४०५ कामगार कुटुंबांना पोलिस आयुक्तांपासून ते पोलिस उपायुक्तांपर्यंतच्या अधिकाऱ्यांनी आसरा अन् आधार देत त्यांची पाठवणी केली. संवेदनशील पोलिसांनी २५ हजार परप्रांतीय कामगारांना त्यांच्या घरी सुखरुप पोचविण्यासाठी मदतीचा हात दिला. राज्यातील व परराज्यातील कामगार, विद्यार्थी, पर्यटक, रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची वैद्यकीय कागदपत्रांची पडताळणी करुन त्यांना पोलिस परवानगी देत आहेत. पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांच्यासह अतिरीक्त पोलिस आयुक्त, उपायुक्त यांची टिम रात्रंदिवस लोकांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी धडपडत आहेत.