
पुणे : ‘‘वैचारिक जगतात माणसाच्या अतिरिक्त आणि असभ्य महात्त्वाकांक्षेमुळे जे प्रश्न निर्माण होत आहेत, ती घाण भयानक आहे. अशा वातावरणात सत्यशोधनाची प्रक्रिया अखंड सुरू ठेवली पाहिजे,’’ असा सल्ला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी दिला.
सत्यशोधक समाजाच्या वर्धापनदिनानिमित्त ‘सत्यशोधक युवा परिषद’ आयोजित केली होती. परिषदेत डॉ. आढाव यांनी संवाद साधला. एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र, अभ्यासिका विद्यार्थी समिती, छात्रभारती, हमीद दलवाई रिसर्च सेंटर,
कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत, युवक क्रांती दल, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, गडकिल्ले सत्यशोधक मोहीम, मासूम संस्था, संतुलन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित केला होता. डॉ. आढाव म्हणाले, ‘‘बुद्धी गतिमान असणे, हे माणसाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे माणसाचे जीवन दररोज बदलत आहे. त्यात सत्यशोधक चळवळ सुरू ठेवायला हवी. देशातील प्रत्येक माणसाच्या बुद्धीने आणि कर्तृत्वाने एकत्रितरीत्या देश घडवायचा आहे.’’
यावेळी सुभाष वारे म्हणाले,‘‘आज प्रत्येक जण अस्वस्थ मानसिकतेत जगत आहेत. या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी काहीजण बाबाबुवा, काहीजण समुपदेशक, तर काहीजण ध्यानधारणा याकडे वळतात.
परंतु सत्यशोधनाचा मुळ विचार स्वत: आणि इतरांना आनंदाने जगू देण्याचा आहे. माणसाच्या बुद्धीला घातलेली बंधने तोडणारा सत्यशोधक विचार आहे. त्यामुळे नागरिकांना जगण्यातील आनंद शोधण्यासाठी अखेर सत्यशोधक विचारांकडेच वळावे लागणार आहे.’’
एकमेकांना मैत्रीचा धागा बांधून ‘बंध मैत्रीचे’ उपक्रमातून कार्यक्रमाची सुरवात झाली. युवा परिषदेत नाटिका, पोवाडा, एकपात्री सादरीकरण, पथनाट्य, कौन बनेगा सत्यशोधक अशा कार्यक्रमांचे आयोजक संस्थांनी सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपेंद्र टण्णू यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.