
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटे 6 वाजता हिंजवडी आयटी पार्क, माण आणि मारुंजी परिसराचा आकस्मिक दौरा करत विकासकामांचा आढावा घेतला. अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, वाहतूक कोंडी आणि पाणी साचण्याच्या समस्यांमुळे हिंजवडी परिसराची बदनामी होत असल्याचा संताप व्यक्त करत त्यांनी सरपंच आणि विकासकांना खडसावलं. “आयटी पार्क बंगळुरू-हैदराबादला जात आहे, पण इथल्या समस्यांमुळे पुण्याची बदनामी होतेय. मी का पहाटे सहा वाजता फिरतोय?” असा सवाल करत अजित पवारांनी प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश दिले.