
खेड-शिवापूर- येथील ईश्वर बबन पांगारे आणि बाळासाहेब रामचंद्र वाडकर यांचे ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्ज पात्र ठरविण्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. मात्र, या दोन्ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या. तसेच, याचिकाकर्ते शिवाजी लक्ष्मण वाडकर आणि किरण दौलत गोसावी यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने ठोठावला आहे. न्यायाधीश आर. डी. धनुका आणि न्यायाधीश माधव जे. जामदार यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.
'युपीएससी'ची 8 ते 17 जानेवारीपर्यंत परीक्षा ! 'एमपीएससी'ची...
वेळू ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वॉर्ड क्रमांक दोनमधून वेळूचे माजी उपसरपंच ईश्वर पांगारे, तर वॉर्ड क्रमांक चारमधून बाळासाहेब रामचंद्र वाडकर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, काही वर्षांपूर्वी पांगारे आणि वाडकर यांच्यावर ३९ (१) प्रमाणे कारवाई झाली होती. त्यानुसार ते दोघेजण ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अपात्र असल्याचे सांगून त्यांच्या उमेदवारी अर्जावर वाडकर आणि गोसावी यांनी हरकत घेतली होती. ती फेटाळून लावत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पांगारे आणि वाडकर यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरवले होते.
या निर्णयाविरोधात शिवाजी वाडकर आणि किरण गोसावी यांनी २ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर ४ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत वेळू ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय कायम ठेवत न्यायालयाने या याचिका फेटाळून लावल्या. तसेच, याचिकाकर्त्यांना न्यायालयाने प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पांगारे आणि वाडकर यांच्या वतीने ॲड. राजीव पाटील आणि ॲड. प्रशांत मोहन पाटील यांनी काम पाहिले. याबाबत याचिकाकर्ते शिवाजी वाडकर म्हणाले, ‘‘आम्ही दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे.’’
AUSvsIND : सिडनीत टीम इंडिया कांगारुंविरोधात यॉर्कर शस्त्राचा वापर करणार?
या कारणामुळे फेटाळली याचिका
मूळ ग्रामपंचायत अधिनियमामध्ये सदस्य, उपसरपंच किंवा सरपंचाने आपले कर्तव्य पार पाडताना गैरवर्तन व गैरकारभार केल्यास मूळ ग्रामपंचायत अधिनियम ३१(१) मध्ये संबंधित सदस्य पाच वर्षे निवडणूक लढविण्यासाठी अपात्र राहील, अशी शिक्षेची तरतूद होती. यामध्ये सन २०१७ मध्ये दुरुस्ती होऊन त्यात निवडणूक लढविण्यासाठी अपात्रतेचा कालावधी सहा वर्षे केला. वेळूचे माजी उपसरपंच ईश्वर पांगारे आणि सदस्य बाळासाहेब वाडकर यांच्यावर सन २०१५ मध्ये कारवाई झाली होती. त्यामुळे नवीन दुरुस्तीचा नियम त्यांना लागू होणार नाही, असे स्पष्ट करून मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिका फेटाळल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.