
मार्केट यार्ड : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील अडतदारांना सन्मानाने वागणूक दिली जात नाही, तसेच बेकायदा आणि चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांना पाठबळ दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनच्या कांदा-बटाटा-लसूण विभागातून निवडून आलेले संचालक अविनाश मोरडे यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा देताना हे आरोप केले आहेत.