

पुणे: उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना राज्यातील अनेक गावांना करावा लागतो. पण ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील परसुल ग्रामपंचायतीने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अजब निर्णय घेतल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विहीरीतून तिसरा हंडा पाणी उपसाल तर 100 रुपये दंड भरावा लागेल असा अजब निर्णय ग्रामपंचायतीकडून देण्यात आलेला आहे. ग्रामपंचायतीच्या या निर्णयाची चांगलीच चर्चा रंगली आहे.