

Municipal Authorities Plan Full Capacity Sewage Treatment
Saklal
कात्रज : कात्रज तलावात मिसळणारे वसाहतीतील मलनिस्सारणाचे पाणी स्वतंत्रपणे वळवून ते थेट मल्लनिसारण वाहिनीद्वारे नायडू सांडपाणी प्रक्रिया केंद्रात (एसटीपी) नेण्यात येणार आहे. यामुळे तलाव परिसरातील दुर्गंधीची समस्या कायमस्वरूपी कमी होईल, असा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. कात्रज नवी वसाहत, संतोषनगर आणि आजूबाजूच्या भागातून येणारे मैलापाणी प्रक्रिया न होता तलावात जात असल्याने तलावाची दुरवस्था झाली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.