
भारत आणि पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूरनंतर तणाव वाढला होता. शस्त्रसंधीमुळे तणाव कमी झाला असला तरी पाकिस्तान किंवा दहशतवाद्यांकडून हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर पुणे शहरात हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दहशतवादी संघटनांकडून संभाव्य हल्ल्याचा धोका लक्षात घेता पुणे पोलिसांनी सुरक्षा उपाययोजनांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे.