

The civic body has also directed police to prepare special traffic arrangements to manage the increased movement of pilgrims across Pune.
ESakal
पुणे : आळंदी येथील पूरस्थितीमुळे पालखी सोहळ्यातील वारकरी दोन दिवस आधीच पुण्यात मुक्कामी असणार आहेत. त्यामुळे महापालिकेने शहरात सुरू असलेली पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ७ जुलै ते १२ जुलै या कालावधीत शहरातील सर्व भागात पूर्ण पाणी पुरवठा होणार आहे. तोपर्यंत धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली तर ही पाणी कपात पुढे ठेवायची की नाही याचा निर्णय नंतर जाहीर केला जाणार आहे. महापौर मंजूषा नागपुरे यांनी ही माहिती दिली.