Rabi Stubble Burning Study
Sakal
प्रज्वल रामटेके
पुणे : हवेच्या प्रदूषणावर आणि शेतजळणीवर चर्चा झाली की दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील भातशेतीच्या धसकट जाळण्याकडेच सर्वाधिक लक्ष दिले जाते. मात्र, गव्हाची काढणी झाल्यानंतर एप्रिल-मे महिन्यांत होणाऱ्या शेतजळणीचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. विशेषतः उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये गेल्या दहा वर्षांत या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. परिणामी, उन्हाळ्यातही हवेतील सूक्ष्म प्रदूषकांचे प्रमाण धोकादायक पातळीवर पोहोचत असल्याने शेतजळणीविरोधातील धोरण केवळ खरीप हंगामापुरते मर्यादित न ठेवता रब्बी हंगामासाठीही स्वतंत्र उपाययोजना करण्याची गरज संशोधकांनी व्यक्त केली आहे.