
इंदापूर : शेतकरी आत्महत्या करतोय, 90 हजार कोटीची ठेकेदारांची बिले थककेली आहेत त्यामुळे ठेकेदार आत्महत्या करतोय. कंत्राटी पद्धतीने वेगवेगळे विभागात काम करणारे सरकारचे कर्मचारी आहेत त्यांच्या पगारी नाहीत. रोजगार हमीतून ज्या शेतकऱ्यांनी विहिरी काढले आहेत त्यांना मजुरी मिळत नाही.गाजावाजा करून मुख्यमंत्री पानंद योजना राबवली त्या योजनेला पैसा नाही.यामुळे सरकारकडे ज्या जबाबदार असतात त्या पूर्ण होताना दिसत नाहीत असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.